Wednesday, August 26, 2015


पान नंबर ०७ व ०८
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 07
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    लीचे म्हणणे ऐकताच परमेश्वर, गूढ स्वरांत, किंचित हसतच म्हणाला, हे कली, तू वृथा (विनाकारण) का चिंता करतोस, तू स्वतःच एवढा प्रबळ (ताकदीचा) आहेस, कि त्या मानवांवर देखिल तू आपला यथावकाश प्रभाव पाडशील, तेव्हा तुला चिंता वाटायचे कारण नाही. तसेच तुझ्या युगांत मला जाणून माझी भक्ती व त्याग करण्याची प्रवृत्ती ही एवढी साधी व सोपी गोष्ट तू तुझ्या प्रभावामध्ये राहूच देणार नाहीस, हे मला माहित आहे. हे कली, तुझे पृथ्विलोकांत जाण्याचा समय आता निकट आला आहे, तरी उचित समय येतांच तेथे जाऊन तू आपल्या स्वतःच्या स्वभावगुण प्रमाणे पृथ्वीलोकी तुझा प्रकाश (प्रभाव) पाडू शकतोस.
    रमेश्वराची आज्ञा ऎकुन भेदरलेला कली धीर धरून स्वतःला स्पष्ट करत याचना करत म्हणाला, हे परमात्मन, मला आपण भूमंडळी (पृथ्विलोकी) पाठवतच असाल तर, हे माझे स्वामी, माझे गुण कृपा करून समजून घ्या. मी पृथ्विलोकी पोहोचतांच, धर्माचा उच्छेद (नाश) करेन. हे परमेश्वर, कृपया तुम्ही माझ्या कार्यात काहीही अडथळा न आणता, आपल्या जागी तटस्थ व आनंदी असावे. माझ्या गुणांमुळे आपोआप तेथे, कलह (भांडण) परनिंदा सुरु होईल. परद्रव्य (दुसऱ्याची संपत्ती) लुटणारे व परस्त्री (दुसऱ्यांच्या बायका) लुटणारे, असेसारे माझ्या बंधूप्रमाणे असतील. व्यक्तिप्रपंच, मत्सर (द्वेष), दम्भक (खोटे बोलणारे) हे माझे कायम जिवलग असतील. बकासुर सारखे संन्यासी हे तर माझे जणू प्राणच असतील जे दुसऱ्यांचा छळ करून आपले पोट भरतील अशी लोक माझे प्राणप्रिय मित्र असतील. मात्र जी लोक पुण्यवंत, श्रद्धा ठेवणारे असतील त्यांना मात्र मी माझे शत्रू मानेन.
    लीची, येणाऱ्या संभाव्य स्थिती बद्दल होणारी आशंका, त्याबद्दलची याचना व प्रतिक्रिया पाहून परमेश्वराने कलीला उपदेश करत म्हणाले, तुझ्या कलियुगांत त्या समयाला मानवाला आयुष्य कमी असणार आहे, पूर्वीच्या तीनही युगांत मानवाला आयुष्य भरपूर असायचे, त्यामुळे त्यांना जप, तप, अनुष्ठान हे सर्व तसेच चारही आश्रम व संपूर्ण आयुष्य भोगूनच त्यांना गती प्राप्त व्हायची. मात्र तुझ्या युगांत त्यांचे वयोमान अल्प असल्यामुळे, त्याच्यातही जे जन तप व अनुष्ठान करतील ते लवकरच परमार्थाला पावतील. तसेच जे जन मला ओळखून म्हणजेच ब्रह्मज्ञानी असतील व मला जाणून आपले आयुष्यांत सतकर्म (पुण्य) करतील, अशांना मात्र तू सहाय्य करावेस, व कलियुगांत तू असेच कायम वागावेस.
    हे परमेश्वराचे वचन ऐकताच आधीच घाबरलेल्या कलीची त्रेधाच उडाली, त्याच्या अंगात परत कापरे भरले, त्याला जणू "दे माय धरणी ठाय," अशीच अवस्था झाली. त्याच अवस्थेत कली अत्यंत संयम राखून, विनयाने व अजिजी करत बोलू लागला, हे माझ्या स्वामी परमेश्वरा, तुम्ही ज्या लोकांचे मी सहाय्य करावे असे मला सांगता, तेच तर खरे माझे वैरी व शत्रू असणार आहेत. अशी लोक ज्या ज्या ठिकाणी असतील, तेथे माझे जाणे, माझ्याकरता तर निव्वळ अशक्यप्राय होईल. त्यांच्या श्वासांचा घ्वनी (आवाज) जरी मी ऐकला तरी मला मरणप्राय भय वाटेल, तर मी त्या अशा ठिकाणी जाऊ शकणारच नाही. पृथ्विलोकांत पांचशत (पाचशे) खंडांत, भरतखंड (त्यावेळेचा भारत) ह्या ठिकाणी तर अशा पुण्यवंत ब्रह्मज्ञानी जनांची संख्या खूपच आहे, ते तर मला सर्वांदेखत मारूनच टाकतील, अशा परिस्थितीत काय माझ्या जाण्याचा उपयोग? व गेलो तरी मी काहीच करू शकणार नाही व जेथे माझी धडगत नाही, तेथे हे परमेश्वरा मी कसा काय जाऊ? आपणच कृपा करून मला सांगावे व माझा मार्ग प्रशस्त करावा.
    ह्यावर हास्य करत परमेश्वर, कलीला समजावण्याच्या सुरांत बोलला, हे कली, हे तर मी सर्व जाणतो, त्या करताच योजना आहे कि, तू पृथ्विलोकांत जातांना तुझ्याबरोबर काळात्म्याला घेऊन जा. काळात्म्याचे स्वतःचे असे अनुपम वैशिष्ट्य व गुण आहेत कि तो जनांत संभ्रम व आकर्षण निर्माण करून, तुझ्या गुणांना सहाय्यभूत होऊन धर्माचे छेदन (नाश) करेल, धर्म भावना असलेल्या जनांना (लोकांना) अधर्माचे तात्कालिक परंतु तत्काळ फायदे व क्षणिक सुखांच्याकडे आकर्षित करेल, व त्यांचे सुख पाहून इतरही जनांचे कर्म, बुद्धी व मन पापांकडेच वळेल.


Pg 08
शोधिशी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ||
मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी,
सूर येती कसे, वाजते बासरी |
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी,
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी ||
  शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
गंध का हासतो, पाकळी सारुनी
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी |
भोवताली तुला, साद घाली कुणी,
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी ||
  शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
भेटतो देव का, पुजनी अर्चनी,
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी |
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी,
आंधळा खेळ हा, खेळशी कुठवरी||
शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ||
    गीतकार : वंदना विटणकर,
    संगीतकार : श्रीकांत ठाकरे,
    गायक : महंमद रफी

    रमेश्वराचे बोलणे एकुनदेखील कलीच्या मनांचे समाधान होत नव्हते, त्याच्या मनांत परमेश्वराची आराधना, व भक्ती करणाऱ्या लोकांप्रतीची भिती काहीकेल्या जाता जात नव्हती, त्याने परमेश्वराशी थोडे अधिक स्पष्टच बोलायचे ठरवले, व म्हणाला, जे जन पृथ्विलोकांत राहतात, त्यांतले जे माझे शत्रू व वैरी असतील त्यांच्याबद्दल, हे माझ्या स्वामी, मी तुम्हाला सविस्तर सांगतो, कृपा करून माझे एकुन घ्या. जे जन शिवहरीला भजतात, धर्मपरायण राहतात, व असे करून मला उपद्रव निर्माण करतात, तसेच आणखीही वैरी आहेत ते सांगतो, जे गंगातिरी, वाराणसी काठी राहून धर्माचे पालन करतात, जे जन आपल्या पायी जाऊन तीर्थाटन करत पुराण ऐकतात, ज्या जनांच्या मनांत शांती वसते, ते माझ्या ख्याती प्रमाणे माझे शत्रू ठरतात. जे जन अदांभिकपणे दानधर्म करतात त्यांना बघताच मला तर भितीच वाटते. जे जन आपल्या नाकासमोर लक्ष्य ठेवून जप व अनुष्ठान करतात, त्यांच्यावर माझी चुकुनजरी दृष्टी पडली, तर माझा प्राण जातो कि काय? अशी माझी अवस्था होते. जे जन आपल्या बायको व मुलांवर प्रेम करतांत परंतु आपल्या मातापित्याचा खोटेनाटे बोलून व अव्हेर करून राहतांत किंवा त्याग करतात, त्यांच्यावर माझे खास प्रेम असेल, व अशी लोक माझे परम मित्र असतील. वेद्शास्त्रांना जे जन निन्दतात, हरिहरांत भेदाभेद करतात, किंवा शिव, विष्णू, ह्यांना दूषणं देतात असे जन म्हणजे माझे परम आप्तच होय. जे जन आपल्या ईन्द्रियांवर विजय पावतात (मिळवतात), सदा हरीहराला भजतात व उपासना करतात, जे जन राग व द्वेष पासून नियमित लांब राहतात, ह्यांच्यापासून देखील मला अतिशय भयाक्रांत व्हायला होते.
    लीचे, उद्बोधक संभाषण एकुन कर्ताकरविता परमेश्वर, कलीला जाणीव देत, उपदेशून म्हणाला, हे कली, तुझ्या प्रभाव प्रकाशाला तू कसा विसरतो आहेस, तझा प्रभाव जो आहे तो भरपूर आहे, जो तू स्वतः देखील आज तू ओळखत नाहीस. तुझ्या प्रभावाप्रमाणे, तू पृथ्विलोकी पोहोचतांच, व तुझा अंमल चालू होतांच, काळात्म्याचे सहाय्याने तुझा असा प्रभाव पडेल कि, जनसाधारण वर्ग तुझ्या ईच्छेप्रमाणेच वागू लागतील. असे फारच विरळा असेल कि जो माझ्याप्रती भक्तीप्रमाण व पुण्यवंत असेल, त्याला मात्र तू सहाय्यभूत हो, व अशाचप्रकारे तू पृथ्विलोकी असावेस व आपले कार्य करावेस.
    ही परमेश्वराची आज्ञा ऐकतांच कली सटपटला, त्याची दयनीय अवस्था होऊन अधिकच मान खाली झुकली, त्याच्या सर्वांगावर शहारे आले. त्याला त्याच्या कलीयुगांत, त्याची त्याच्या मनाप्रमाणे स्वतःची अशी पूर्ण पृथ्वीलोकी निरंकुश सत्ता व पूर्ण अधिपत्य स्थापित करणे, हे अशक्यप्राय आहे, ह्याची त्याला पूर्ण जाणीव होऊ लागली. आता मात्र परमेश्वराला कसे व कोणत्या शब्दांत आपल्याजोगे करून घ्यावे, ह्या विवंचनेतच कलीचा चेहरा आणखीनच कासावीस झाला. काही वेळ तर त्याच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. एकंदरच पाहता कली संपूर्णच गलितगात्र झालेला होता. त्याला आता त्याच्या स्वतःच्याच स्वभावाचा राग येऊ लागला, काय करावे सुचेना, सखोल विचार करता करता, अचानकच त्याला काहीतरी सुचले, व अकल्पितपणे काही कळल्यासारखे त्याचा चेहरा, जो आतापर्यंत अपरिमित उद्विग्न, वेडावाकडा व भेसूर दिसत होता, तो आता अचानाकपणे अत्यंत संयमी व धीरगंभीर दिसू लागला.
    ता कली अत्यंत शांत संयमित आवाजांत विनयाने, सर्वशक्तिमान अशा परमेश्वराला आपले दोन्ही हात जोडून नमन करून, आर्जव करीत बोलू लागला, म्हणाला, हे माझ्या स्वामी, माझ्या दुष्ट स्वभाव आपणांस अवगत असतांना, मी धर्माला, व धर्माने चालणाऱ्यांना, कसे काय सहाय्यभूत होऊ शकेन व होईन? हे माझ्या दिनानाथा, मी तर तुमचाच दास आहे, कृपा करून काहीतरी मार्ग व असा उपाय आपण मला सांगावा, कि मी कोणत्या रीतीने पृथ्विलोकी चालू शकेन? तसेच कसे व कोणत्या रीतीने रहाटावे? (चालावे व वागावे?)
    तामात्र परमेश्वराला कलीचे चातुर्य पाहून अत्यंत गहन हास्य फुटले, व हसतच पृथ्विलोकी कशाप्रकारे वागावे, व वर्तावे हे उपदेशून सांगू लागला, हे कली, तू पृथ्विलोकी जातांच, "वेळ" म्हणजेच "वेग" अशी माझी शक्ती, जी पुर्व कालापासून पृथ्विलोकी कार्यान्वित आहे, तुझा अंमल सुरु होतांच, तुला सहाय्यभूत होईल, व "काळ व वेळ" हे दोघे स्वतःचे कार्य व गुण अबाधित राखून, तुझे गुणांचा अंगीकार (स्विकार) करतील. आता "काळ व वेळ" हेच पृथ्विलोकी तुझे स्वतःचे कनिष्ठ घटक राहून, तुला पुढचा मार्गही सुगम करतील व दाखवतील. जे जन निर्मल मनाने वागत असतील त्यांना शत्रू व जे जन आपल्या मनी व अंगी दुर्विचार व मलमूत्रा सारख्या वास येणारे व्यसन बाळगून असतील, अशांना तू तुझे इष्टवर्ग मानु शकतोस.
    ह्याचसारख्या पापपुण्याचा जो विरोधाभास राहतो, तो नाहीसा करून जे जन, अधिक पुण्य प्राप्त करतील, ते मात्र तुला जिंकू शकतील, तुला जिंकणारे, असे पुण्यवंत ह्या पृथ्विलोकी फार विरळाच असतील. तसेच, जे जन निष्काम भावना अंगी बाणवून, आपले कर्म ईश्वराला वाहून, भक्ती करत, पापपुण्यच्या बेडीत न अडकता, स्वतःला उच्चासनावर नेउन ठेवतील, असे पुण्यवंत तर विरळात विरळा होऊ शकेल. ते तर तुला निश्चितच जिंकू शकतील. व बाकीचे सारे तुझ्या आकर्षणाला, व प्रलोभनाला बळी पडून तुला वश होऊन आपल्या स्वतःच्या विनाशाला स्वतःच कारणीभूत होतील. लक्ष्य देऊन ऐक, जे जन तुझा उपद्रव सहन करत आपले व्यवहार तुला न स्विकारता मला ओळखून माझी भक्ती करत राहतील, त्यांची परीक्षा काही काळ झाल्यावर मात्र तू त्यांना सहाय्य करावे, व जे जन तुझे दारूण यातना, अवहेलना सहन करू शकणार नाहीत, व तुझ्या आकर्षणाला, प्रलोभनाला बळी पडतील, तुझे वश्य असतील, असे तुझ्या कलियुगांत जे जे जन्म होतील, अशा जनांना मी कधीच प्राप्त होणार नाही.

पुढे प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणांत आपण सर्व वाचकहो वाचाल, सत्गुरुंची महिमा, सत्गुरुचे महत्व व त्याची ताकद, परमेश्वराने काय वर्णिली? सत्गुरू कसा असतो? सत्गुरू कसा असावा लागतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील पानांत मिळतील.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Thursday, August 20, 2015


पान नंबर ०५ व ०६
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 05
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    ह्याचेहि उत्तर मी खरेतर अगोदरच दिलेले आहे. परंतु आपणाला हे पहायचे आहे कि असे का होते? आपल्याला आठवते का? कि कधी आपण काही दिवसांपूर्वी किंवा काही क्षणांपूर्वी मंदिर, चर्च, किंवा मस्जिद मध्ये जरी कधी गेलो, तर आपण तिथे गेलो असतां, त्या पवित्र अशा वास्तूमध्ये पोहोचल्यावर, आपल्या मनांत काय काय चांगले विचार स्फुरले, आपण कशा काय आपल्या चुका होऊन द्यायच्या नाहीत, असे, परमेश्वराला साक्षी ठेऊन, स्वतःच आपल्या मनाशी ठरवले, हे सर्व थोड्याच वेळांत त्या वास्तू मधून (मंदिरा मधून) बाहेर पडल्या बरोबर थोड्यांच वेळात विसरतो, तसेंच आपल्याला परमेश्वराचाही विसर पडतो, व त्याने आपल्याला जे काही नियम (निर्बंध) लावले आहेत, त्याचाही विसर पडतो. आपण भोगविलासवादी, अहंभावी, मतलबी, हेकेखोर, आपलेपरके मानणारे, वस्तुनिष्ठ, असे सर्वकाही होतो. आपल्याला हे सर्व माहित आहे, कि हे सर्वकाही चुकीचे आहे. आपण दु:खी होण्याचे हीच कारण आहेत हि जाणीव होऊनही परत परत आपण विसरतो. हे असे आपल्याबरोबर का होते? ह्याचा आपण आतापर्यंत का बरे शोध व मागोवा घेतला नाही? व ईच्छा झाली तरी, थोड्याच वेळांत, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो? असे आपल्या बरोबर का होते? हे होण्याचे नेमके काय कारण आहे. ते आपण आता पाहूया व नीट समजून घेऊया.
    ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे खरे तर हिंदू पुराणांत फार फार पूर्वीच म्हणजे ईसा पूर्व २२०० वर्ष, अगोदरच विस्तृत करून, परमेश्वराने दिलेली आहेत. जी काही पुराण, आजही पुस्तकरूपाने आपल्याला मिळतात, त्यामध्ये प्रामुख्याने परमेश्वराने सृष्टीची केलेली रचना, सृष्टीचे संगोपन, व चार युगांची स्थापना ह्या सर्व गोष्टींचे वर्णन सापडते. तर चला आपण आता हि चार युग काय आहेत, व आपण आता कलियुगात आहोत, तर, प्रामुख्याने त्याची माहिती पुराणांप्रमाणे काय आहे, ती लक्षांत घेऊ.

क्रमवार जी चार युग पृथ्वीवर अवतरली.
१. "सत्य युग"
२. "त्रेता युग"
३. "द्वापार युग"
४. "कली युग"

आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

    ता आपण सर्वप्रथम कलीयुगाचीच माहिती घेऊ, कारण आपण आज कलीयुगांतच रहात आहोत, व अग्रक्रमाने म्हणजेच प्राधान्याने आपल्याला तीच माहिती प्रथम हवी आहे. वाटल्यास नंतर आपण पहिल्या तीन युगांची माहिती घेऊ शकतो.
    ज्यावेळेस "द्वापारयुगाचा" शेवट जवळ आला आणि द्वापारयुगामध्ये ज्या ज्या काही घटना, त्या वेळच्या मानवांमुळे घडल्या कि जिथे स्वयं परमेश्वराने अवतार घेतला होता, व त्या घटना सावरायचा प्रयत्न पण केला, अशी काही कारण घडली कि कलियुगाचा प्रारंभ करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस परमेश्वराला अगोदरच ठरलेल्या प्रमाणे माहित होते, कि कलीयुगाची स्थापना करण्याची वेळ जवळ आली आहे. आणि त्याकरता कली (एक शक्ती) ला पृथ्वीवर पाठवावे लागणार आहे. परमेश्वराने हे नियोजन पृथ्वीवरील माणस कलीच्या अंमलाखाली, प्रभावाखाली असतांना परमेश्वराप्रती, माणूसकीप्रती, लहान मुलांप्रती, आपल्या आई वडिलांप्रती, आजारी व अपंग लोकांप्रती, समाजाप्रती कशी वागतात, हे पहाण्यासाठी विशेषत्वाने केलेले होते.
    येथे मी हिंदू पुराणांपैकी एक पुराण, ज्याचे शीर्षक (नाव) गुरुचरित्र असे आहे, हे गुरुचरित्र स्वतः सद्गुरु नृसिंहसरस्वतीजींनी उपदेशून लिहून घेतले आहे, व ह्या चरित्रांत "कली" विषयी संपूर्ण माहिती उद्धृत (उपलब्ध) केलेली आहे, ह्याच पुराणाचा संदर्भ येथे घेतलेला आहे.


Pg 06
          कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
इलेक्ट्रिक, हि आपल्या रोजच्या वापरातली "वस्तू" नव्हे "उर्जा" आहे. आपण असे समजतो, आपली कमाई आहे, तर आपण कितीहि विजेचा वापर करू शकतो, व तो हक्क आपल्याला आहे. पण खरेच तसे आहे का?
कदाचित असे तर नाही? कि, आपण त्या गोष्टीतल्या राजासारखे, तो राजा, जेथे हात ठेवेल, त्याचे सोने झाले, आणि शेवटी त्यालाच धाय मोकलून रडावे लागते, म्हणजेच आपल्या देशांत, आपण निष्कारण वीज, आणि विजेसारख्या अन्य गोष्टी योग्य रीतीने न वापरता बेशुमार वापरून आपल्याच अधोगतीला आपण स्वतःच जबाबदार होतो?
भारतामध्ये अजूनही अपारंपारिक पद्धतीपेक्षा, (काही राजनीतिक कारणाने) पारंपारिक पद्धतच (उर्जा स्त्रोत) वापरावा लागतो. हे नैसर्गिक स्त्रोत, पूर्वी म्हणजे १९९८ साली, जेव्हढे होते, तेव्हढेच आजही आहेत, कदाचित काही कारणांने त्यांत बिघाड झाला, तर मात्र वीजनिर्मिती कमी होते, परंतु वीजनिर्मिती वाढवण्याचा एकही प्रशस्त मार्ग अजूनपर्यंत आपल्याला सापडलेला नाही.
असे असतांना, विचार करा, १९९८ सालापासून आज २०१५ सालापर्यंत, आपण किती वीज उपयोगी वस्तू आपल्या वापरामध्ये वाढवल्या? व त्याच्यावर आज अवलंबून आहोत. तसेच किती घर वाढली? किती लोकसंख्या वाढली? किती कार्यालय व किती कारखाने वाढले?
आपल्याला असे वाटते का? कि उद्योगधंदे वाढू नयेत, रोजगार निर्मिती होऊ नयेत? आपली मुले शिक्षित असून देखील बेरोजगार रहावीत. आपले जीवन चांगले गेले, बास झाले, येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीचा नाश झाला तरी चालेल, मी मात्र आहे, तसंच वागणार व रहाणार? व त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार?
आज वस्तुस्थिती अशी आहे, कि मागणीपेक्षा पुरवठा फक्त निम्माच आहे. अशा अवस्थेत आपण असतांना, आपण बेफिकीर रहातो, हे कितपत योग्य आहे? उद्या अशी अवस्था निर्माण झाली, कि पैसा आहे पण वापरायला वीज नाही, रात्री मुलांच्या आभ्यासाला लाईट नाही, तर आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही. कारण जे झाले, जे होत आहे, त्याला आपणच जबाबदार नाही का?

    ज्यावेळेस द्वापारयुगाचा अवधी संपूर्ण संपायला काही थोडेच दिवस बाकी होते, ऐक दिवस "परमेश्वराने" कलीला त्वरित आपल्यासमोर उपस्थित होण्याकरता निरोप पाठवला. ज्या क्षणी कलीला परमेश्वरासमक्ष उपस्थित होण्याचा निरोप मिळाला, त्याच क्षणी कलीचा थरकाप उडाला, अत्यंत घाबरला, त्याची अशी दयनीय परिस्थिती होण्याचे कारणही तसेच होते, कलीला अगोदरच देवलोकी काहीशी माहिती झालेली होती, कि कदाचित लवकरच त्याला परमेश्वराची आज्ञा होणार आहे, व पृथ्वीवर जावे लागणार आहे, तो प्रार्थना करत होता, कि परमेश्वराने आपला निर्णय बदलावा. परंतु आतामात्र तशी काही आशा धुसर (दिसेनाशी) झाली. कलीला माहित होते, पृथ्वीवर अशी माणस आहेत, जी परमेश्वराला ओळखतात व मानतात, परमेश्वराच्या नियमांनुसार आपले जीवन व्यतीत करतात, निसर्गाला आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात. त्यांचे खडतर जप, जाप्य, तप, अनुष्ठान, व्रत, त्यांचे अनुशासन, त्यांची मोक्षप्राप्ती, हे सर्व ऎकुनच कलीला छातीत धडकी भरल्यासारखे व्हायचे. त्याला माहिती होते, कि जर तो पृथ्वीवर गेला, तर तो काही थोडे दिवस देखील राहू शकणार नाही. हि पुण्यवंत माणसं, त्याच्या प्रभावाखाली येणे हि अशक्यप्राय गोष्ट आहे, ह्याची त्याला पुरेपूर जाणीव होती. त्याला स्वतःचा स्वभाव कसा आहे, ह्याची देखील पूर्णपणे कल्पना होती. त्याला मनोमन असेही वाटत होते, कि काय उपयोग होणार आहे जाऊन, परत तर यावेच लागेल. मी काहीच करू शकणार नाहीये, माझे शासन ह्या मानवांवर चालणे हि अशक्यकोटीतली गोष्ट आहे, व माझा स्वभाव देखील भक्तिमार्ग व तत्सम इतर कोणतेही मार्ग, ह्यासर्व गोष्टींपेक्षा माझे गुण व माझा स्वभाव वेगळा आहे, मी हे कसे परमेश्वराला समजवावे, त्याचे डोकच चालेनासे झाले.
    ली व ईश्वराचा आजपर्यंत कधीही जास्त समोरासमोर येण्याचा प्रसंग आला नव्हता. कलीला कांही पांहून, काही एकून, परमेश्वराची कल्पना मात्र पूर्ण होती. आजपर्यंत ज्या काही आज्ञा परमेश्वराकडून त्याला मिळाल्या, त्याने त्या पूर्ण पाळल्या. परंतु ज्या आत्ताच्या नवीन आज्ञेची त्याला कल्पना आली होती, त्याची पूर्तता करणे, हेच त्याच्या मनःस्थिती बिघडण्यास कारण झाल होत, कलीला स्वतःचा स्वभाव पूर्णपणाने परमेश्वराच्या समोर उघड करण्याची लज्जा वाटत होती, व म्हणूनच सर्वप्रकारे त्याची कुचंबणा होणे हे साहजिकच होते.
    लीला अनेकप्रकाराने विचार करूनदेखील काही उपाय सापडणे कठीण झाले, त्याला त्याचे स्वतःचे प्रश्न सुटणे दुर्धर व अवघड दिसू लागले व तो विचार करून करून पूर्णपणाने शिणला. सर्वात शेवटी त्यच्या मनांत आले कि आता लज्जा बाळगून काही उपयोग नाही. जेव्हा परमेश्वराचे बोलावणे आलेच आहे तर आपल्याला कसेही त्यांच्या समक्ष उपस्थित व्हावेच लागणार, हे त्याला पूर्णपणे कळून चुकले. तेव्हा आपण त्यांनाच ह्यावरचा मार्ग विचारू, आपला सोडवणुकीचा मार्ग तेव्हाच सापडेल व आपण काही निर्णयाप्रत येऊ शकू. असा विचार ध्यानी मनी करून, त्याने काही मनाशी योजना बनवली, व तो परमेश्वराकडे निघाला.
    रमेश्वरासमोर जातांना कली संपूर्ण विवस्त्र (जे निर्लज्ज व अंतःकरण हीनतेचे उद्बोधक), वृद्ध देह धारण करून, व पिशाच्चासारखे मुख बनवून, धडपडत, उठत, वेड्यावाकड्या उड्या मारत, वाम (डाव्या) हाती आपले लिंग धरलेले व उजव्या हाती आपली जिव्हा (जीभ) धरलेली, त्याच अवस्थेत अपशब्द (शिवी) व परमेश्वराची स्तुती देखिल करत, अशाप्रकारे परमेश्वरासमोर उपस्थित झाला.
    लीची ही दशा, सोंग (रूप, अवस्था) पाहून परमेश्वराला गुढ विचारपुर्वक हसू आले, व अत्यंत प्रेमाने विचारले, हे कली तू आपल्या हाती लिंग व जिव्हा का धरली आहेस? तुझे हे असे वागण्याचे काय प्रयोजन (हेतू, सांगावयाचे) आहे?
    ह्यावर उत्तर देत नम्रतेने कली म्हणाला, हे माझ्या परमेश्वरा, मला जर आपण पृथ्वीलोक पाठवणार असाल तर समस्त (पूर्ण) पृथ्वीलोक मला जिंकायचा आहे, पण ज्या मानवांचा (माणसांचा) आपल्या लिंग व जिव्हा ह्यावर पूर्ण नियंत्रण (ताबा) असेल, त्यांच्यापासून मला प्रचंड भीती वाटते, ह्या कारणानेच मी माझे लिंग व जिव्हा हाती धरून होतो. तसेच, ज्यांचे नियंत्रण, ह्या दोन्ही गोष्टींवर नाही, त्यांचे व्यवहार व गुण पिशाच्च सारखे राहून, जशी काम मर्कट करतो, त्याप्रमाणेच त्यांची कर्म व वचने उलट सुलट असतील, तसेंच ते अकाली वार्धक्यत्वाला पावून, जराजर्जर अवस्थेत, स्वतःचा अकाली नाश करून घेतील, अशा मानवांना मी माझे हितचिंतक मानतो, त्यांना मी क्षणिक का होईना पण मी सुखी करेन, ज्यायोगे ते माझीच भक्ती करून, माझेच गुणगान करतील, त्यांचे पाहून इतरही जन त्याच मार्गावर चालतील. अशा मानवांना मी माझे हितचिंतक मानतो, त्यांना मी प्रारंभिक का होईना पण मी सुखी करेन, ज्यायोगे ते माझीच भक्ती करून, माझेच गुणगान करतील, त्यांचे पाहून इतरही जन त्याच मार्गावर चालतील. मात्र असे जे जन असतील जे तुमची भक्ती, प्रार्थना करतील, त्यांच्यापासून मला घाबरायलाच होत. मी फक्त तुम्हाला सोडून कुणाही शक्ती किंवा अस्त्र, शस्त्राला घाबरत नाही, म्हणून ह्याचकारणाने मी आपले निजस्वरूप असे आपणासमोर प्रस्तुत (उघड) करत आहे.

आपण, पुढच्या येत्या प्रसिद्ध होणाऱ्या पानांवर परमेश्वराचे व कलीचे काय संभाषण झाले? कलीचा काय आग्रह होता? परमेश्वराने काय नियोजन केले? कलीवर काय काय बंधन घातली? मानवाला स्वतःचा उद्धार करून, ईश्वर प्राप्तीचे काय सोपे मार्ग तयार करून ठेवले? हे सर्व, जसे जसे पुढे वाचत जाल , तसतसे, तुमचे तुम्हाला स्वतःला पडलेले प्रश्न आपोआप सुटत गेलेले दिसतील, व हे निश्चित आहे.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Tuesday, August 11, 2015


पान नंबर ०३ व ०४
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 03
  कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    ता आपण असे पाहूया, कि काही जरी आपल्या पूर्वजांनी चूक केली, तरीही भूतकालात असे काय असे ऎकहि उदाहरण घडले नाही का? कि ज्यायोगे मुलाला फक्त माहित पडले कि ह्या जगात काहीच कायम धायम नाही, ह्या पृथ्वीवर, आपल्या डोळ्यांना दिसते ती प्रत्येक गोष्ट वस्तू, एकतर नाशिवंत आहेच, व नाहीतर, काही ज्या गोष्टी जर लांब काळ टिकत असतील असे वाटते, तर त्या गोष्टींना हा निसर्ग जीर्ण शीर्ण (जुन्या, नाकामी) करून संपवून टाकतो, बदलत रहाणे, हा निसर्गाचा नियम आहे, आणि हि खरी वस्तुस्थिती, आपल्या मुलांच्या लक्ष्यांत वेळीच आली, किंवा आणून दिली, तर मुल, त्या डोळ्यांना दिसणाऱ्या व आकर्षित करणाऱ्या सर्व मोहमयी वस्तूंचा आकर्षणाचा त्याग करून, आपल्या शिक्षणावर तसेच आपले आयुष्या मध्ये जे लक्ष्य निर्धारित केले असेल तिकडे आपले लक्ष्य केंद्रित करतील, व आपला जीवनमार्ग चांगल्या दिशेने नेण्यास तत्पर होतील. हो, अशी उदाहरण तर बरीच घडली, त्यातलेच एक उदाहरण, जे जास्तीत जास्त लोकांच्या परिचयाचे देखील आहे, परंतु त्याकडे पूर्णपणाने लक्ष्य द्यावे असे आपण लक्ष मात्र दिलेले नाही, असेच उदाहरण आपण आता पाहूया.

आयुष्यातली सर्वात महत्वाचे वळण घेणारी घटना.
    जेव्हा राजकुमार सिद्धार्थ तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला एक युवक होता. एक दिवस त्याला काही कामानिमित्ताने राजवाड्याबाहेर जायचे होते. त्यानिमित्ताने तो आपल्या सारथीला घेऊन रथावरून निघाला. त्यावेळेस त्या राजवाड्याच्या जवळच्या नगराच्या काहीशा शांत असलेल्या रस्त्यावरून जात असताना, त्याने अशा काही गोष्टी पाहिल्या कि त्याला असे काही गंभीर विचार करण्यास भाग पडले कि त्याचे सर्व आमुलाग्र जिवनचक्रच बदलून गेले. त्याने असा एक वृद्ध पाहिला, जो अत्यंत जर्जर व थकलेल्या अवस्थेमध्ये रस्त्यावरून आपले पाय फरफटत चालत जात होता. अजून थोडे पुढे गेले असता त्याला रस्त्याच्या कडेला एक आजारी, प्रकृतीने क्षीण, अत्यंत वेदनाग्रस्त असा माणूस दिसला, सिद्धार्थने आपल्या सारथ्याला रथ सावकाश चालवण्यास सांगण्याचा इशारा केला, परंतु काहीच बोलला नाही. आता अजून थोडे पुढे गेले असता, त्याला एक संन्यासी, जो भगवे कपडे, हातांत कमंडलू, गळ्यांत रुद्राक्षमाला, व केसांच्या वाढलेल्या जटा अशा अवस्थेत रस्त्याच्या कडेने जात असताना दिसला. रथ सावकाश पुढे जातच होता, अजून थोडे पुढे गेल्यावर सिद्धार्थला एक अंत्ययात्रा (मेलेल्या माणसाला चार माणस खांद्यावर घेऊन) जातांना दिसली.
    आता मात्र सिद्धार्थ उद्विग्न (गंभीर, परेशान) झाला, त्याने त्याच्या आयुष्यांत हे सर्वकाही असे पाहिलेच नव्हते, रथ पुढे सावकाश जातच होता, तो सिद्धार्थने सारथ्याला रथ थांबवण्यास सांगून, सिद्धार्थ सारथ्याला ह्या सर्व माणसाच्या अवस्था, वेदना, व मृत्यू ह्यांचा परस्पर संबंध व ह्याचा एकमेकांशी काय संदर्भ, बाबत प्रश्न विचारू लागला. सारथी थोडा गांगरून गेला, परंतु त्याने त्याच्यापरीने पुन्हपुन्हा सिद्धार्थला समजावले देखील, परंतु सिद्धार्थचे काहीही समाधान होऊ शकले नाही.
    विचारांचे काहूर भरलेल्या अशा स्थितीत, सिद्धार्थने, थांबवलेला रथ गंतव्य स्थानी जायचे सोडून, परत राजवाड्याकडे नेण्यास सांगितले. हे सर्व दुख्दायक, कष्टप्रद, यातनांने भरलेले आयुष्य, व जीवनाचा असा शेवट, पाहिले असतांना सिद्धार्थला ते असहनीय झाले. तो शांतीपूर्ण, खऱ्या सुखाचा शोध, मानवी जीवनाचा खरा आनन्द, व कल्याण हेच त्याच्या आयुष्याचे खरे ध्येय असे मानून आपल्या राजसी जीवनाचा सर्वसंग परित्याग करून आपल्या ध्येयाप्रती जाण्यास सिद्धार्थ तत्पर झाला.
(हाच राजकुमार सिद्धार्थ, पुढे जाउन "महात्मा गौतम बुद्ध" ह्या नांवाने प्रसिद्ध झाला)
आणखी माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

    जच्या काळात, आजच्या घडीला, प्रत्येक मानव, प्रत्येक समाज, प्रत्येक प्रांत, प्रत्येक देश, सर्व मानव जात, ह्या सुखाच्या, शांतिपूर्ण जीवनाच्या शोधांत आहेत. परंतु असे काही आहे कि जसे "हे, माणसा, सर्व तवसंगी, अन ध्यानीमनी| काय तव चक्षुंनी शोधत आहेस त्रिभुवनी"|| ह्यालाच असेही म्हणता येईल कि "काखेला कळसा| आणि गावाला वळसा”|| काय तुम्हाला पटते? काय तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? तुम्ही कदाचित सहमत असाल किंवा नसालहि, परंतु ह्याचे नेमके मर्म काय आहे? हे समजणे आपल्या जीवनांत अत्यंत आवश्यक आहे.
(घाबरू नका, हा विषय, इथे तुम्हाला "परमेश्वराचे ज्ञान" समजून घ्यायचा आहे, कुठलीही जात, धर्म, संप्रदाय, बदलण्याचा, किंवा बनवण्याचा नाही. आपला सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवधर्म)



Pg 04
ह्या पानावरचा मजकूर वाचतांना लक्षांत ठेवा, कि आज पृथ्वीवर कलियुग चालू आहे, व त्याचा आपल्यावर विलक्षण पगडा (पकड) आहे. त्यामुळेच सभोवार दिसणाऱ्या सर्व मायाजालाचा, अधिक त्रास होऊन, आपण त्यांत जास्तीत जास्तच गुरफटले जातो. त्यांतून सुटण्याचा मार्ग, मी पुढे येणाऱ्या पानांवर आपणांसाठी प्रस्तुत, लिहिणार आहेच. त्यांत कलियुग पृथ्वीवर आरंभ होण्याअगोदर म्हणजेच त्रेतायुगाच्या शेवटी, परमेश्वर आणि कली ह्यांच्यात काय संभाषण झाले, कलीने त्याचे पाश मानवांवर कसे टाकायचे, त्याच्या बद्दल काय योजना बनवली? परमेश्वराने कलीला काय निर्बंध घातले? कलियुगाच्या अंतिम वेळेच्या अगोदर, कली त्याचे मायापाश, कसे जास्तच आवळेल? परमेश्वराने मानवाला ह्यातून सुटायचे, सुखी व आनंदी राहण्याचे काय मार्ग अगोदरच विस्तार करून ठेवलेले आहेत? जे आपल्याला माहित नाहीत, ते मार्ग आपल्याला संपूर्ण माहीत करून घ्यायचे आहेत, व तेच आपले लक्ष्य आहे.
हे सर्वच आपण सर्वांकरता प्रत्येक सप्ताहाच्या बुधवारी लिहिणारच आहे. आपण फक्त वाचत रहा व आपला सुखमय मार्ग, सोपा, सहज मोकळा होईल.

    काय हे शक्य आहे का? जरूर आहे, असे माझे म्हणणे आहे. होय, आणि हे जरूर शक्य आहे. हे सर्व तुम्ही वाचल्यावर तुमचेही दुमत रहाणार नाही. कारण कि गौतम बुद्ध, त्यांना साक्षात्कार झाल्यावर, ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या त्या ठिकाणी, म्हणजेच, नेपाल, तिबेट, चीन, आणि भारत, मध्ये त्यांनी परमेश्वराचा संदेश, व त्यांचे विचार मांडले, तसे तसे लोक त्यांच्या बरोबर त्यांचे शिष्य होत गेले. हो, आज काहीअंशी जरी प्रभाव कमी झाला असला, तरी हे जरूर लक्षांत यावे कि आजही ८०% प्रभाव टिकून आहे. तसेच हेही लक्षांत घेतले पाहिजे, कि जर आपण ते ज्ञान व विचारांची एकूण व्याप्ती समजून घेतली, तर त्या लोकांना व सर्व इतरांना, आजच्या कम्प्युटर व इंटरनेटच्या सहाय्याने हे ज्ञान सर्वदूर पसरायला काहीच वेळ लागणार नाही.
    काय, तुम्ही विचार करता, कि लोकांचे विचार बदलणे, लोकांच्या मनांत विश्वास जागवणे, त्यांना प्रेरित करणे, आजच्या घडीला, आजच्या काळांत हे होणे शक्य आहे का? होय आहे, निश्चितच आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही त्याकडे लक्ष्य देऊ नका, तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा उद्धार करून घ्या, कारण, हे ज्ञान प्रत्येकाने, प्रथम आपल्या स्वतःचे स्वतः जीवन व आत्म्याचा उद्धार करण्यासाठी आहे. तुमचे जीवन बघून, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाइक, असे सर्वजण आपोआपच सुधारतील. तसेच एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, असे करत आपोआपच सर्व जग तुमच्या पावलांवर पाउल, ठेऊन आपले उदिष्ट्य गाठेल. यांत काहीच संशय नाही.
    रीपण, कसे आणि काय हे मी तुम्हाला पटवून देण्याचा पूर्णपणाने प्रयत्न करतो. परंतु हे सर्व करायला, काय करावे लागेल? मला माहित आहे, आपण गौतम बुद्ध नाही, आपण त्याच्या बुद्धीएवढे क्षमतेचे देखील नाही, परंतु हेही लक्षांत घ्या कि आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले, तर हे अशक्य हि नाही, आणि म्हणून तर आपल्याला काही मुलभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. व आपल्याला आपल्यापासून, आपल्या घरापासून सुरवात करावी लागेल, व त्याकरिता आणखी पुढे कुठेही जाण्याची आवश्यकता देखील भासणार नाही. कारण आपण व आपली मुले सुधारली, तर आपले घर सुधारेल, आपली वागणूक बघून व थोडे समजावून आपला शेजारी सुधारेल, व प्रत्येक घरांतून प्रयत्न झाला तर आपला विभाग सुधारेल, असे करता करता, आपला देश सुधारायला जास्त वेळ लागणार नाही. मला वाटते मी फार घाई करतो आहे, तसे खरे तर नाहीये. तुम्ही तुमच्यावर जास्त ताण घेऊ नका. जसजसे तुम्ही पुढे वाचत जाल तसतसे ते आपोआपच तुम्हाला समजून येईल.
    पण हे करतांना हे हि लक्ष्यांत घ्या कि आपण फक्त आपला स्वतःचा जीवन मार्गच सुधारत नाही, तर आपण आपल्या आत्म्याचा जो कि परमेश्वराचा अंश आहे, त्याचाही उद्धार करतो आहोत. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला देखील सन्मार्गाचा रस्ता दाखवत (बनवत) आहोत. व हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कि आपण स्वतः जो प्रयत्न करू, तो प्रामाणिकपणे करू. होय येथे फक्त प्रामाणिकपणा आणि तोही फक्त आपल्या स्वतःकरिता फार आवश्यक आहे.
    ला तर आपण ह्याच्या एक एक करून, सर्व मुलभूत गोष्टींकडे पाहूया. जसे कि सुरवातीलाच आपण पाहिले, नवजात मुल आणि त्याच्या हालचाली जसे कि ते सर्वप्रथम आपल्या आईलाच ओळखते, व त्याचे उत्तरही पाहिले कि ते आईच्या उदरांत नऊ महिने होते, व तिच्या आवाजाला व स्पर्शाला ओळखते. आता आपण पाहूया कि आईच्या उदरांत व वडिलांच्या शुक्राणू मध्ये येण्याअगोदर हा आत्मा कोठे होता? आता सर्वजण उत्तर देतील, सोपे आहे, हा आत्मा परमेश्वराकडे होता, आता इथे सहज एक प्रश्न उठतो, कि हा आत्मा परमेश्वराकडे किती काळ (वेळ) होता? तर साधारण असेच उत्तर येईल कि निश्चितच ९ महिन्यांपेक्षा जास्तच काळ असला पाहिजे. मग आता तुम्हीच मला सांगा, ज्यावेळेस नऊ महिने आईच्या उदरांत मुल (आत्मा) राहते, व जन्म झाल्यावर आईला ओळखते, तर नऊ महिन्यांपेक्षा जास्त वेळ परमेश्वराच्याकडे राहिलेले बाळ, म्हणजेच बाळाचा आत्मा परमेश्वराला ओळखत नाही काय?
    ता आपण सर्वांचे व माझेदेखील उत्तर असेच असणार आहे, कि होय बाळ परमेश्वराला ओळखत होते. म्हणजेच आपण सर्व लहान म्हणजेच बाळ असतांना, आपणही ह्या जगनियंता परमेश्वराला ओळखत होतो.
    मग असे असतांना बाळ मोठे झाल्यावर परमेश्वराला कसे काय बरे विसरले? आपणही मोठे झाल्यावर परमेश्वराला कसे विसरलो? कुठे बर आपला घात झाला, हे आपल्याला कळायला नको काय? आपण ह्याचा शोध का बरे नाही करत? हे आपले चुकत नाही काय?


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Monday, August 3, 2015


पान नंबर ०१ व ०२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

मी तुम्हाला जाहीर सांगू इच्छितो:
माझ्या सर्व प्रिय वाचकहो, मी ह्या ब्लॉग, वेबसाईटमध्ये परमेश्वराच्या अनुभूती व अंत:प्रेरणेने श्रीगुरुचरित्र व भगवतगीता चे सार सहज आणि सोपे करून, सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ब्लॉग कोणत्याही वयोगटाची व्यक्ती वाचू शकते. ह्या ब्लॉगमध्ये मला जे जे काही माझ्या गुरु कडून कळले, व सत्संग वारंवार करून, श्रीसत्गुरुंच्या आशीर्वादाने व त्यायोगे आत्मज्ञानाने समजले, ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व काहिही आपणा सर्वांपासून लपवलेले नाही, मी हे जे काही लिहिले आहे ते सर्व मानवांकरता असून, ते कोणत्याही जाती, धर्म अथवा संप्रदाय ह्यांना उद्देशून नाही, तसेच माझी त्यावर काहीही टीका करायची ईच्छा व तसा दृष्टीकोणही नाही.
हे सर्व लिहिले आहे, ह्याचा हेतू जाती, धर्म, संप्रदाय बदलण्याचा नाही, व जाती, धर्म बदलणे हा काही परमेश्वराच्या जवळ पोचण्याचा मार्गहि नाही, कारण परमेश्वराची स्वतःची कोणतीही जात, संप्रदाय वा धर्म नाही. तो सर्व मानवांची, प्राणीमात्रांची, व सर्व सृष्टीची काळजी घेतो, तो आपल्याला आपल्या शरीर वा नावावरून ओळखत नाही, तर तो आपल्याला ऎक जीव, त्याचा ऎक परमअंश, त्याच्याच परम तत्वाचा एक अंश म्हणून समजतो, व तसेच तो सर्व सृष्टीला देखील पाहतो.
त्याने आपल्याला माणसाचा काया, वाचा असलेला देह दिला व सुंदर असे मन दिले, व तो परमेश्वर आपल्या प्रत्येका कडून अशी अपेक्षा करतो कि आपण सर्व मनुष्य ऎक नियमबद्ध आयुष्य, करुणा, दया, व मनुष्यधर्म एक्मेकान्प्रती, निसर्गाप्रती व प्रत्येक जीवाप्रती दाखवून माणुसकीने राहावे, व परमेश्वराची भक्ती करावी. जो माणूस परमेश्वराला ओळखून त्याची भक्ती करेल, त्याच्यामध्ये ह्या सर्व भावना आपोआप उत्प्पन्न होतील व फक्त त्याचीच भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल, असे श्रीमदभगवत गीता मध्ये निष्ठुन श्रीकृष्णाने वारंवार सांगितले आहे. परमेश्वराची भक्ती ही कोणत्याही एकाच समाज, धर्म, संप्रदाय, जातीवर्ण, कायावर्ण वा वयोगटाची बांधील नाही, ही भक्ती कोणीही करू शकतो. हा ब्लॉग लिहिण्याचा हेतू हाच कि, आपणा सर्वांचे कल्याण व्हावे, आपणा सर्वांचे लक्ष ह्या गोष्टीकडे म्हणजेच निष्काम भक्तीकडे वळावे व भगवतगीता मध्ये सांगितल्या प्रमाणे साक्षात निर्गुण निराकार परमेश्वराचा आपणा सर्वांना साक्षात्कार घडावा हीच निरंकार परमेश्वराकडे प्रार्थना करतो. वाचकहो जर तुम्ही ह्या ब्लॉगची पाने काळजी पूर्वक वारंवार वाचली, तर आपोआप तुमची अंतःस्फूर्ती जागृत होऊन, तुम्ही निरंकार परमेश्वराच्या निकट जाल, व तो करुणामयी परमेश्वर स्वतः होऊन तुम्हाला सत्गुरू प्रदान करून अधिकच जवळ घेईल, ह्या मध्ये काहीही शंका बाळगू नका.
Pg 01

    पल्याला (सर्वांना) असे वाटते व डोळ्यांना दिसते, कि आपण सर्व जसे काया, वाचा, मनाने वेगवेगळे आहोत तसेच त्यामुळे आपला एकमेकांशी काही संबंध नाही, तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या सृष्टी पासून देखील एक व्यक्ती म्हणून आपण वेगळे आहोत, असेच सर्वजण समजतात, वास्तविक आपण सर्व मानव व आपल्या सभोवती असणारी सृष्टी (निसर्ग) हे सर्व कायम एकमेकांशी कसे काय संपूर्णपणे निगडित आहोत, हे समजणे अत्यंत आवश्यक आहे, व ते समजले तरच तरच आपण ह्या मानव जन्म मिळाल्याचे सार्थक करू शकतो. तरी इथे आपले मुळापासून आपले काय चुकते, ते पाहण्याकरता, त्याचे मर्म जाणून घेण्याकरता आपण सुरवात एका लहान नवजात मुलापासून करू.
    जेव्हा ऎक मुल जन्माला येते, आपला श्वासोश्वास सुरु करते, व आपल्या सभोवतालचे जग पहाते, त्यावेळेस त्याला सर्व काही नवीन आश्चर्यदायक वाटू लागते, त्याला हेही कळते, कि आपला तुरुंगवास संपला व आपण कुठल्यातरी नवीन विश्वामध्ये आलेलो आहोत. जसेही थोडे दिवस जातात, बाळ सर्वप्रथम फक्त आपल्या आईला, तिच्या आवाजावरून, तिच्या स्पर्शावरून ओळखू लागते. असे का होते?
    सोपे, आणि स्पष्ट उत्तर आहे, कि हे बाळ आपल्या आईच्या उष्ण गर्भामध्ये नऊ महीने राहिले, तिचा आवाज, तिच्या अंगाची उष्णता, त्याला परिचित होते. आपण हे नैसर्गिक आहे, असे समजून व जास्त विचार न करता सोडून देतो. येथेच आपले आणखी काहीतरी चुकते, ह्या नैसर्गिक गोष्टीमागे आणखी ऎक नैसर्गिक गोष्ट लपलेली आहे, आपण तिकडे आपले लक्ष्य देतच नाही, व आपल्याच भ्रमात राहतो. ती काय गोष्ट आहे?
    जेव्हा बाळ आपल्या सभोवताली बघू लागते, तेव्हा प्रथम ते आपल्या आईला, वडिलांना व आपल्या नातेवाईकांना बघते, नंतर त्याचे लक्ष्य त्याच्या करता आणलेल्या खेळण्यांकडे जाते. त्याला हे सर्व पाहून आश्चर्यचकित व्हायला होत. कारण त्याने हे सर्व काहीही कधी बघितलेले नसते. त्या बाळाला नवनवीन वस्तू बघायची तर वेगवेगळे आवाज ऐकण्याची आस लागते, प्रत्येक नवीन गोष्ट आपण पहावी, हि प्रथम इच्छा येथेच जन्म घेते.
    पण मुलांना त्यांच्या वयाच्या नऊ ते दहा वर्षापर्यंत देवाची लेकरे, देवांप्रमाणेच आहेत, असे म्हणून समजतो व सर्वांकडून ऎकतो. परंतु असे का समजायचे? का मानायचे? फक्त दिसावयास गोंडस व शरीराने कोमल असतांत म्हणून? ह्याकडे आपण कधीही लक्ष्य दिलेले आहे का?
    रेच हि मुले परमेश्वराचीच लेकरे आहेत, हे मी देखील मानतो. त्यांना वयाच्या सात ते आठ वर्षांपर्यंत काय चूक आहे व काय बरोबर आहे ह्याचे ज्ञान नसते. त्यांना फक्त प्रत्येक नवीन गोष्टींमध्ये आकर्षण वाटत असते व ते सर्व गोष्टींना चांगलेच समजतात. त्यांच्यात कुठल्याही गोष्टीला वाईट समजण्याची प्रवृतीच नसते. पण फक्त हीच ऎक गोष्ट नाही तर आणखीही ऎक गोष्ट आहे, ज्यामुळे त्यंच्या वयाच्या तीन ते चार वर्षांपर्यंत परमेश्वरच त्यंच्या ठायी आहे हे मानण्यासाठी आपणांस भाग पाडते. ती काय गोष्ट आहे?
    पण हे सर्वकाही जे ऐकतो, पहातो तसेच वाचतो ते सर्व आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वभावानुसार समजते, व तसेच आपण समजून घेऊ ईच्छितो, व तसेच आपण ऎकु देखील ईच्छितो, त्यामुळेच आपण फार मोठ्ठी चूक करून बसतो. ती काय चूक आहे? त्यामुळेच आपल्याकडून गर्भपात व लहान मुलांची हिंसा असे जघन्य अपराध देखील घडतात.
    सेच त्याबरोबरच आपण आणखीही काही अशा चुका करत असतो, की ज्या आपल्या कडून कळत नकळत घडत असतात. त्याच्या बद्दल आपण येथे माहिती करून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे असे आपल्याला नाही वाटत का?
    हान मुल जेव्हा जेव्हा ह्या परमेश्वराच्या सृष्टीकडे, नवीन नवीन वस्तूंकडे पाहतात, त्या त्या वेळेस, त्या मुलाला वेगवेगळे नवनवीन प्रश्न पडत असतात, व ते मुल आपल्याला त्या त्या प्रश्नांची उत्तरे विचारत असतात. आपण काही प्रश्नांची उत्तर आवडीने देतो, व काहीवेळा जास्त प्रश्न विचारले असताना आपण भंडावून गेल्याप्रमाणे त्यांना काही बाही, उत्तर देवून आपला पिच्छा सोडवून घेतो. काही उत्तरे देतो परंतु आपली सर्व उत्तरे हि नुसती त्याचा वेळ घालवायची अशाप्रकारची असतात. आपण त्याला काहीही मुलभूत अशा ज्या खऱ्या गोष्टींची (प्रकारांची) माहिती त्याला अभिप्रेत (आवश्यकता) असते, ती देत तर नाहीच, उलटपक्षी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपण हे सर्व कळत नकळत करत करतो. ही आपली चूक आहे असे नाही वाटत का? आपण काय केले पाहिजे?


Pg 02
प्रिय, वाचकहो लक्ष्य द्या!
ह्या पानावरचा मजकूर वाचतांना लक्षांत ठेवा, कि आज पृथ्वीवर कलियुग चालू आहे, व त्याचा आपल्यावर पगडा (पकड) आहे. त्यामुळेच सभोवार दिसणाऱ्या सर्व मायाजालाचा, अधिक त्रास होऊन, आपण त्यांत जास्तच जास्त गुरफटले जातो. त्यांतून सुटण्याचा मार्ग, मी पुढे येणाऱ्या पानांवर आपणांसाठी प्रस्तुत, लिहिणार आहेच. त्यांत कलियुग पृथ्वीवर आरंभ होण्याअगोदर म्हणजेच त्रेतायुगाच्या शेवटी, परमेश्वर आणि कली ह्यांच्यात काय संभाषण झाले, कलीने त्याचे पाश मानवांवर कसे टाकायचे, त्याच्या बद्दल काय योजना बनवली? परमेश्वराने कलीला काय निर्बंध घातले? कलियुगाच्या अंतिम वेळेच्या अगोदर, कली त्याचे मायापाश, कसे जास्तच आवळेल? परमेश्वराने मानवाला ह्यातून सुटायचे, सुखी व आनंदी राहण्याचे काय मार्ग अगोदरच विस्तार करून ठेवलेले आहेत? जे आपल्याला माहित नाहीत.
हे सर्वच आपण सर्वांकरता प्रत्येक सप्ताहाच्या बुधवारी लिहिणारच आहे. आपण फक्त वाचत रहा व आपला सुखमय मार्ग, सोपा, सहज मोकळा होईल.

    बाळ जेव्हा जन्म घेते, तेव्हाच परमेश्वराने त्याच्या शरीराला जोडलेले दोन डोळे दिलेले असतात. हे मुल ज्या ज्यावेळेस त्याच्या खेळण्यांकडे, ह्या निसर्गाकडे, त्याच्या आजूबाजूला जे जे काही पाहते, त्या सर्व वस्तू व सर्व गोष्टी त्याला खऱ्याच वाटतात, व तसेच तो मोठा होई पर्यंत मानतो.
    पण असे समजतो, मुल लहान आहे, त्याला काय कळते? येथे आपणास कळले पाहिजे की लहान मुलांची स्मरणशक्ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. आपण त्यांना अशी थातूर मातुर उत्तर देवून त्यांचे फार मोठे कळतनकळत नुकसानच करत असतो. आपण असे समजतो, मुल मोठे झाले कि त्याला आपोआप सर्व काही कळेल. पण तोपर्यंत खूप खूप उशीर होणार आहे, हे आपल्याला त्यावेळेला तर कळत नाही, तसेच मुले मोठी झाल्यावर देखील, आपण त्यांना वाढवतांना आणखी काय चुका केल्या ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला नसते. कि मुले त्यांच्या वयाच्या ६ ते ७ वर्षांपर्यंत अर्धेअधिक वस्तुनिष्ठ बनतांत, व वयाच्या ९ ते ११ वर्षांपर्यंत पूर्णपणाने त्यांनी वस्तुनिष्ठता आपल्या अंगी जोपासलेली व बाणवलेली असते. व आता आपल्याला हीच चूक सुधारायची आहे. ती कशी? (येथे वस्तुनिष्ठता याचा अर्थ: आत्यंतिक आकर्षण, त्या वस्तू शिवाय न चालणे)
    पण हे मुलांना, जेव्हा ती लहान असतात, त्याचवेळेस त्यंच्या मनावर बिंबवायला पाहिजे, कि हे सर्व पृथ्वीवर जे काही दृश्यमान आहे, म्हणजेच आपल्या डोळ्यांना जे जे काही दिसते, ते ते सर्वकाही नाशिवंत आहे, तसेच जे काही कायम टिकेल असे वाटते, त्या वस्तू, त्या गोष्टींचा हा निसर्ग नाश करणार आहे व तो ते करेल. अशी कोणतीही वस्तू व अशी कोणतीही गोष्ट ह्या जगात नाही कि जी कायम धायम आहे, व ती कायम टिकेल, व निरंतर सुख प्राप्त करून देईल, तरी अशा क्षणिक गोष्टींना (वस्तूंना) प्राप्त करण्याची धडपड केवळ व निव्वळ वृथाच असेल, व सर्वात शेवटी आपल्याला समाधान मिळणे तर दूरच, दुखः आणि हानी मात्र होण्याची शक्यता मात्र फार जास्तच वाढते.
    ला माहित आहे, कि किती जणांना व किती आईवडिलांना हि खरी वस्तुस्थिती माहित असून वा माहित पडल्यावर, आपल्या मुलांना समजावण्यास योग्य व आवश्यक आहे हे त्यांना स्वतःला कितपत पटेल व रुचेल? हा प्रश्न पडतो, कारण ज्यांनी आपल्या लहान वयापासून हि वस्तुनिष्ठता आपल्या अंगी इतकी बाणवून घेतलेली असते, कि मूळ म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच पचनी हे पडणे, म्हणजे महादुर्लभच गोष्ट आहे, असे वाटते. परंतु त्यांनी हे आठवावे व कायम लक्षांत ठेवावे कि ह्या वस्तुनिष्ठतेमुळे आजपर्यंत आपण किती दुखः, किती यातना भोगल्या? काय आपल्याला कधी आत्मसमाधान मिळाले का? तसेच त्यांना हेही कळावयास पाहिजे कि ह्याच वस्तुनिष्ठतेमुळे असूया, द्वेष, अहंकार, भोगविलासवादीपणा जागृत होतो व एकदा जागृत झालेला तो कुठलाही दुर्भाव कधी शांत झाला होतो का? कि उलट त्याची वाढच कायम होत जाते?, व त्याचं प्रकारांच्या दुर्भावनांमुळे निस्सिम अपराध घडण्यास, व अशा प्रकारच्या दुर्घटनांना चालना मिळण्यास मदतच होते. त्यांना हि जाणीव व्हावयास पाहिजे, कि काय त्यांची मुले देखील तीच दुखः त्याचं यातना भोगण्यास सामोरे जावेत? मी हे देखील सांगतो, ज्यांनी ज्यांनी, व ज्या आईवडिलांनी हि वस्तुस्थिती नीटपणे जाणून घेतली, व मानली, तसेच आपल्या मुलांना समजावून दिली, ते आईवडील व त्यांची मुले, मलाच काय तर पुढे येणाऱ्या वेळेला आपल्या कर्तुत्वाने फक्त नुसते यशस्वी होतीलच असे नाही तर त्यांच्या कामगिरीने जगाला कायम वंदनीय ठरतील, हि माझी खात्री आहे.
    मी हे देखील सांगतो, ज्यांनी ज्यांनी, व ज्या आईवडिलांनी हि वस्तुस्थिती नीटपणे जाणून घेतली, व मानली, तसेच आपल्या मुलांना समजावून दिली, ते आईवडील व त्यांची मुले, पुढे जाउन आपले एक वेगळेच विश्व निर्माण करून, आपली एक आदरणीय ओळख, संपूर्ण जगाला करून देतील, व असे करतांना ते सर्वांच्यासाठी एक स्फूर्तीस्थान बनून संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग प्रशस्त करून देतील. तसेच पुढे येणाऱ्या वेळेला व जगाला आपल्या कर्तुत्वाने कायम संस्मरणीय व आदरणीयच ठरतील. हि माझी खात्री आहे, व माझे तुम्हाला वचन आहे.
    र तुम्हाला खात्रीच पटवून घ्यायची असेल, तर स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम आझाद ह्यांचे चरित्र वाचावे. मला सांगा कोणत्या आईवडिलांना वाटते, कि आपली मुले चांगली, कर्तुत्ववान, निर्व्यसनी, वंदनीय, अशी निघू नयेत? त्याचबरोबर हेही लक्षांत ठेवा, छत्रपति शिवाजी महाराजांना, त्यांचा बाल्यावस्थेत, त्यांच्या ध्यानीमनी, आत्मिक, अध्यात्मिक, एक स्वतंत्र बाणा, स्वातंत्र्याची स्फूर्ती, त्यांच्या ठाई, जागवणारी व बाणवणारी, व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, त्यांची आई जीजामाताच आहे, आणि म्हणूनच ते दोघेही आज व कायम जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत सर्व जगाला वंदनीयच रहातील. ह्या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. ह्या एका उदाहरणा वरून, माझ्या प्रिय वाचकहो, तुम्हा सर्वांचा लक्षांत येतंच असेल, कि आई हि आपल्या मुलांची "प्रथम गुरु" ठरते. आणि जे आईवडील आपल्या मुलांना योग्य संस्कार देत नाहीत, त्यांना परमेश्वर देखील वाचवणे कठीण आहे, हे तर सर्व जग मान्य करते. मला माहित आहे, कि सर्वच मुले तेव्हढीच प्रगल्भ निघत नाहीत, परंतु ज्यांचा व्यवहार, व वागणूक चांगले असते, त्यांना सर्वच जग आपलेसे करते, व जग त्यांचा आदर्श नेहेमी आपल्या समोर ठेवते, हे कायम लक्षात असू द्यावे.
    ता आपण असे बघूया, कि किती लोकांना (वयाने मोठे असलेल्यांना) वस्तुनिष्ठता ही गोष्ट माहिती आहे? व किती लोकांना नाही? साधारणपणे असे लक्षांत आले आहे कि ५०% लोकांना हे पूर्णपणे माहितीच नाही, व ४९% लोकांना हे माहिती आहे परंतु ते ह्या गोष्टीकडे काणाडोळा (जसे काही माहितीच नाही) करतात. ह्यामुळे काय घडते? कि अशी सर्व लोक आपल्या जीवनाचा तर नाश तर करतातच, परंतु त्यांच्या घरांत जन्म घेणाऱ्या, त्यंच्या पुढच्या येण्याऱ्या भावी पिढीचा देखील नाश आपल्याच हाताने करतात, व नंतर आयुष्याच्या शेवटी पश्चात्ताप करत राहण्याची पाळी येते.
    मी मानतो कि आपल्या वाडवडिलांनी (पूर्वजांनी) ह्या गोष्टीकडे गांभीर्याने जसे बघावयास पाहिजे होते, ते पाहिले नाही, किंबहुना असेही आहे कि त्यावेळेस आताच्या सारखे दळणवळण, मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी ज्ञान, माहितीचे आदानप्रदान होणे, अवघड काम होते. ते काहीही असो, जर आपल्या पिढीच्या लक्षांत ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षांत आली आहे, तर आपले काम नाही का? आपण आपल्या मुलांना व येणाऱ्या भावी पिढीला वाचवावे? वाचवले पाहिजे, मला वाटते, तुम्ही सर्व माझ्याशी सहमत आहात. काय तर मग तयार आहात ना?


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.